महाराष्ट्र शासन GOVERNMENT OF MAHARASHTRA
Maharashtra emblem

सत्यमेव जयते

ग्रामपंचायत रावळगाव

Gram Panchayat Ravalgao

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA)

ग्रामीण भागाचा सुयोग्य विकास करण्याच्या दृष्टीने उपलब्ध मानवी संपत्तीद्वारे ग्रामीण भागात टिकाऊ सामुहिक मालमत्ता निर्माण करीत असतानाच ग्रामीण भागात राहणाऱ्या व अंग मेहनतीची अकुशल कामे करणाऱ्या मजुरांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम २००५ पारीत केला आहे. सदर कायद्यान्वये ग्रामीण भागातील कुटुंबाला १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देण्याची हमी देण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाने राज्याची रोजगार हमी योजना व केंद्राची राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यांची सांगड घालून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अमलात आणलेली असून तिला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र असे संबोधले जाते.

✓ योजनेची वैशिष्ठे

✓ विविध स्तरावरील कर्तव्ये

१. ग्रामपंचायत स्तर

२. तालुका स्तर

३. उपविभाग स्तर

४. जिल्हा स्तर

✓ सरपंचांची भूमिका